उचल ते गांडीव

विजेच्या लपंडावामुळे हा लेख आपल्या पर्यंत पोहोचायला २७ / ११ ची रात्र झाली त्याबद्दल क्षमस्व!

२६/११ ला  दोन वर्षांपूर्वी मुंबईवर झालेला महाभयंकर दहशतवादी हल्ला!

काही प्रश्न अस्वस्थ करून सोडतात. कुठे उत्तर मिळेल? का उत्तर मलाच गवसेल?

राष्ट्राशी संबंधित, महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करायची म्हटली तर हा हिंदुत्वाचा मुद्दा, तो हिंदुत्वाचा मुद्दा, देशाला आता विकास हवाय! अशी ओरड ऐकू येते. हल्ला झाला तेव्हा विकासच तर चालू होता. म्हणजे सुरक्षा नसली तरी चालेल?

लोकांना इतकं स्वातंत्र्य आधीच मिळालंय, की स्वतंत्र देश झाले. तरीही या देशावर दडपशाहीचा आरोप लावला जातोय. का? अजून काय हवंय ?

अजून दहशतवाद कशासाठी?

कुणापासून स्वातंत्र्य हवंय?  कुणाला? या देशाच्या अधिकृत नागरिकांनीच हा देश सोडावा म्हणून का ? काश्मीरमध्ये काय झालं? आपल्याला माहीतच आहे.

श्रीमद्भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी का सांगितली, ती पार्श्वभूमी आजही लागू आहे. असे कितीतरी अर्जुन शस्त्र टाकून बसले आहेत, ज्यांनी देशासाठी लढायला हवं आहे. न्यायव्यवस्था तोडण्याची आवश्यकता मुळीच नाही. सत्य, स्व -धर्म पालन , निष्ठा, धैर्य ही सगळी शस्त्रेच नाही का?

आपल्यातला अर्जुन जागृत व्हावा आणि त्याने देशासाठी आणि सुरक्षेसाठी लढावं, यास्तव गीतेचाच संदेश, खालील भावकाव्यात ,




उचल ते गांडीव 
आणि
उभा रहा युद्धास

आज्ञा देतो मी तुज
मार
त्या अधर्मियांस

धर्मरक्षण कर्तव्य तुझे
विचार करीत बसणे नाही

ईश्वरे नेमिले तुज
कार्यासी या सदा

कर्तव्य सोडूनी जगता
कलंक येई कीर्तीस तुझ्या

मज जे ज्ञान सांगे तू
अज्ञान ते सत्य आहे

आता कर तेची जे
ज्ञान सनातन सत्य आहे

क्षत्रियांस ना शिष्य - गुरु
क्षत्रियांस ना पुत्र - पिता

युद्ध हे कर्तव्य क्षत्रियांचे
स्मरण कर सत्यास या

विसरलास का धर्म  तुझा
विसरलास का जन्म तुझा

अमानुष ती कर्मे तुझी
विसरलास का सांग मला

बोलणे तुझे मूर्खपणाचे
वीरांस त्या शोभत नाही

क्यैब्य कवटाळून बसणे
वीरांस त्या उचित नाही
जीवनास तुझ्या शोभत नाही

ऊठ ऊठ अतिशीघ्र ऊठ
व्यर्थ वेळ दवडू नको

कर्तव्य तव समोर आहे
दूर त्याहून पळू नको

पुन: पुन्हा हे वचन माझे
विजय युद्धी तुझाच आहे

अधर्माने हे मृत आधीच
समाप्त करणे आता काम तुझे

अविचल ठाम ध्येयावरी राही
चंचलता तुज शोभत नाही

उपदेश माझा ऐक आता
संन्यास नव्हे कर्तव्य तुझे

मिथ्या हे ज्ञान तुझे
उपजले जे मोहाने

सत्य आहे एकच सदा
युद्ध अधर्माशी आता

बघ त्या दीन जनांकडे
जे वाट तव बघत आहेत

त्यांसाठीच जगणे केवळ
कर्तव्य सत्य तुझे


हा लेख राष्ट्रभाषेत चैतन्यपुजा या माझ्या हिंदी ब्लॉग वर बघावा.

भगवद्गीतेतील अमृत नारायणकृपा वर : 

गीता जयन्ति निमित्त भगवद्गीतेत वर्णिलेला कर्मयोग मला समजला तसा :

Inspiration from Bhagwadgeeta


Comments

  1. ज्ञानेशDecember 26, 2010 at 8:13 PM

    सध्याच्या परिस्थितीत असेच उच्च विचार राष्ट्राला देण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  2. दादा! सगळे लेख प्रतिक्रियांची वाट बघताय......

    ReplyDelete
  3. छान आहे.

    रक्त आटते,
    मन सुकते,
    आपल्या राष्ट्रात
    आपणच स्वस्त।
    ‘त्यांच्या’ सांभाळा संवेदना,
    झाकुन आपल्या वेदना।
    वंदेमातरम् नको,
    ‘गुरुला’ फाशी नको।
    समान कायदा नको,
    काश्मिरात पंडीत नको।
    तरीही तोंडे ‘ह्यांची’,
    मक्के कडे सदाची।

    राष्ट्रार्पण

    ReplyDelete
  4. रक्त आता पुन्हा उसळावे,
    मन सुकलेले क्रोधित व्हावे|
    राष्ट्राद्रोह्यांंना आता संपवावे,
    आता फुटतील आपल्या वेदना
    वज्र होऊनी कठोर त्यांना|
    वंदे मातरम गर्जेल पुन्हा,
    राष्ट्रमाता बळी घेईल त्यांचा|
    समान कायदा निसर्ग माने,
    फलित त्यांना दिसेल याचे,
    मक्केतूनही महादेव आता,
    प्रलय करण्या सज्ज आहे|

    ReplyDelete

Post a Comment

हा विचारयज्ञ आपल्या विचारांची वाट बघतोय........